विठ्ठलराव कवळे यांचे वृध्दपकाळाने निधन

|  अहमदनगर | दि.०9 सप्टेंबर २०२४ |  कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील विठ्ठलराव बलभीम कवळे (वय 92) यांचे शुक्रवारी (दि.6) रोजी सायंकाळी अल्पशा अजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

मिरजगाव शहर डॉक्टरर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.विलासराव कवळे व डॉ.विजय कवळै यांचे ते वडील होत. नगलवाडी येथील कवळे मळा, याठिकाणी शुक्रवारी सायंकाळी त्यांच्यावर शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.  

यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मोठा जसमुदाय उपस्थित होता. जुन्या पिढीतील कै.विठ्ठलराव कवळे हे मिरजगाव, नागलवाडी व परिसरात ‘अण्णा’ या नावाने सुपरिचीत होते. त्यांना समाजकार्याची मोठी आवड होती. त्यांनी समाजउपयोगी उपक्रम राबविले. तसेच कष्टकर्‍यांना त्यांनी मदत केली.

समाजसेवेचा वसा घेतलेल्या विठ्ठलराव यांनी आपल्या दोनही मुलांना डॉक्टर करुन समाज सेवाचा वसा पुढे सुरु ठेवण्याचे बाळकडू दिले आहे. त्यांच्या निधानाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

💥 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग 

💥  येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

💥 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

 

 

 

 


Post a Comment

Previous Post Next Post