‘अहिल्यानगर’ नावाला रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील : पालकमंत्री विखे पाटील

| अहमदनगर| दि. 03 सप्टेंबर | 2024 | अहमदनगर रेल्वे स्टेशला अहिल्यानगर नाव देण्यास रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवल्यामुळे रेल्वे स्टेशनच्या नामांतराचा मार्ग मोकळा झाला आहे. नामांतरास रेल्वे विभागाची कोणतीही हरकत नसल्याचे पत्र प्रशासनाला दिल्याने जिल्ह्याच्या नामांतराचा मार्ग आता सुकर झाला झाला आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात भाषण करताना अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव’अहिल्यानगर’ करण्याचा ठराव  महापालिकेत मंजूर करण्यात आला. महापालिकेनंतर आता जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिल्याने रेल्वे स्थानकाचा नामांतराचा मार्ग सुकर झाला आहे. 

👉 येथे क्लिक करा आणि वाचा साप्ताहिक विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post