पांढरी पुलावर आठा तासामध्ये तीन अपघात परंतु....


| अहमदनगर | दि.14 सप्टेंबर 2024 | येथील अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील रहदारीच्या ठिकाणी म्हणजेच पांढरी पुल परिसरात शुक्रवारी (दि.१३ सप्टेंबर) मध्यरात्री १२.३० ते शनिवारी (दि. १४ सप्टेंबर) सकाळी ८ वाजण्याच्या दरम्यान तीन अपघात झाले आहे. 
 
यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु असून. सदरील या अपघातच्या घटनेमध्ये सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. परंतु या अपघातात वाहनांचे आणि एका दुकानाचे मोठे नुसकान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिला अपघात मध्यरात्री १२.३० वाजता झाला. दुसरा अपघात पहाटे ५.३० वाजेच्या दरम्यान घडला.  तर तिसरा अपघात सकाळी ८ वाजेच्या दरम्यान झाला असून समोरचे अपघातग्रस्त वाहन दिसून न आल्याने तो दुसर्‍या वाहनला जावून आदळला.

दरम्यान या ठिकाणी दर सात ते आठ दिवसाला एक तरी अपघात होत असतो. त्यामुळे या ठिकाणी उपाययोजना कराव्यात अशी मागणीचे ठराव परिसरातील वांजुळी, खोसपुरी, पांगरमल, मजले चिंचोली, उदरमल, आव्हाडवाडी, ईमामपुर ग्रामपंचायत यांचे वतीने सार्वजनिक बांधकाम विभागास देणार आहेत. 

 
 
 

Post a Comment

Previous Post Next Post