उड्डाणपूल कामांचा शुभारंभ ; किरण काळेंची राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार

| अहमदनगर | दि.05 ऑगस्ट 2024 | शनिवारी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते, शहराचे आ. संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत नगर शहरामध्ये तीन उड्डाणपूलांच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ हे देखील उपस्थित होते. याबाबत धक्कादायक माहिती शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे.

की, सदर उड्डाणपुलाच्या कामांची निविदाच अद्याप पर्यंत प्रकाशित झालेली नाही. त्यामुळे या कामाची कुठलाही वर्क ऑर्डर नाही. असे असतानाही कामाचा शुभारंभ करणे म्हणजे नगरकर जनतेची दिशाभूल करत फसवणूक करणे सल्याचा गंभीर आरोप काळे यांनी केला आहे. याबाबत काळे यांनी राज्याच्या मुख्य सचिव आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिवांकडे लेखी पत्राद्वारे तक्रार केली आहे.

यामुळे उड्डाणपुलाच्या काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. यावरून आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. किरण काळे यांनी मंत्रालय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या सा.बां. विभागा अंतर्गत निधी मंजूर झाल्याचे सांगत नगर शहरातील डीएसपी चौक, नागपूर एमआयडीसी जवळील सह्याद्री आणि सन फार्मा चौका जवळ आशा तीन दुपदरी उड्डाण पुलांच्या कामांचा शुभारंभ शनिवार दि. ३ ऑगस्ट २०२४ रोजी करण्यात आला. याबाबत अधिक माहिती घेतली असता असे समजले की सदर तीनही उड्डाण पुलांच्या कामाची निविदा अद्याप पर्यंत प्रकाशित झालेली नाही. सदर काम त्यामुळे कोणालाही ॲलॉट झालेले नाही. तसेच या कामाचा त्यामुळे कार्यारंभ आदेश देखील देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. 

"त्यांच्यावर" जनताच कारवाई करेल : किरण काळे म्हणाले की, राहिला प्रश्न पालकमंत्री आणि शहराच्या आमदारांचा. राजकीय जीवनात वावरत असताना जनतेचे लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला निवडून दिलेले असते तेव्हा त्यांनी जनतेची अशा पद्धतीने दिशाभूल करणे हे नैतिकदृष्ट्या अत्यंत गैर आहे. यांच्यावर कारवाई आता जनतेच्या न्यायालयात, निवडणुकीच्या रणांगणात जनताच करेल. 

Post a Comment

Previous Post Next Post