भोरवाडी शिवारात विजेचा शॉक बसून तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

 

| अहमदनगर | दि.10 ऑगस्ट 2024 |शेतात विहिरीवर असलेला वीजपंप चालू करण्यासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणाचा विजेचा शॉक बसून जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील भोरवाडी गावच्या शिवारात शुक्रवारी (दि.९) दुपारी घडली. सागर अनिल ठाणगे असे या मयत युवकाचे नाव आहे.

सागर हा शुक्रवारी शेतात काम करत होता, तो विहिरीवर वीज पंप चालू करण्यासाठी गेला. त्यावेळी त्याला विजेचा शॉक बसला. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. ही बाब लक्षात आल्यावर त्याचे नातेवाईक सुनिल ठाणगे यांनी त्यास दुपारी १.१० च्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथील मेडिकल ऑफिसर डॉ.देवेंद्र गोयल यांनी त्यास उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत सागर याच्या पश्चात आई वडील व १ बहिण असा परिवार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post