| अहमदनगर | दि. २० ऑगस्ट २०२४| अपघातानंतर वांबोरी (तालुका राहुरी) येथील व्यक्तीला मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम व मोबाईल असा १३ हजार ५०० रुपयांचा ऐवज काढून घेतल्याची घटना शुक्रवारी (१६ ऑगस्ट) रात्री नगरमध्ये घडली.
बाळासाहेब श्रीपत कांबळे (वय ४५) असे त्यांचे नाव आहे. त्यांनी शनिवारी (१७ ऑगस्ट) रात्री दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी तिघांंविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांचा शुक्रवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास सावेडीतील तुळजाभवानी मंदिराजवळ अपघात झाला. चारचाकीने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने ते जखमी झाले आहेत. त्यानंतर त्या चारचाकीमधील तिघांनी फिर्यादीला त्यांच्या दुचाकीवर बळजबरीने बसवून एमआयडीसीतील काकंरीया शोरूम येथे नेले.
तेथे त्या तिघांनी फिर्यादीला मारहाण करून त्यांच्या खिशातील साडेतीन हजारांची रोकड व मोबाईल काढून घेतला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
Tags:
Crime