। अहमदनगर । दि.19 जुलै 2022 । नगर तालुका जून महिन्यात आरोग्य विभागाने जिल्ह्यातील २४५९ पाणी नमुने तपासले. त्यापैकी ८५ गावांतील १३२ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. यामध्ये नगर तालुक्यातील दहा गावांचा समावेश असल्याची माहिती समोर आली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी योजना उभ्या करून शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत.
मात्र, दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित असल्याचे समोर येत आहे. जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाकडून नियमितपणे पाण्याच्या नमुन्याची तपासणी केली जाते. तपासणीत पाणी दूषित असल्याचे आढळून आल्यास संबंधित ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाबाबत तसेच इतर उपाययोजना करण्याच्या नोटिसा दिला जातात.
तरी जिल्ह्यातील सर्व गावांना शुद्ध पाणीपुरवठा करणे शक्य होत नसल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जून महिन्यात जिल्ह्यातील विविध ठिकाणाच्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमधील २४५९ पाणी नमुने तपासण्यात आले. त्यापैकी १३२ नमुने दूषित आढळले आहेत.
या ठिकाणी पाणी शुद्धीकरणासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या . नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत तपासते दूषित पाणी आढळलेल्या नगर तालुक्यातील गावांत इमामपूर, राळेगण, शिराढोण, दहिगाव, साकत, नागरदेवळे, बुऱ्हानगर, पांगरमल, उदरमल, पिंपळगाव माळवी व उक्कडगाव ही गावे आहेत.
-------------
👉 राष्ट्रपती निवडणूक २०२२; निवडणूक मतपेटी दिल्लीकडे रवाना
👉 पत्नीला जीन्स घालण्यास विरोध करणे पतीला पडले महागात
👉 कृषी विक्री परवान्यांसाठी ऑनलाईन नोंदणी करावी : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी