कोरोना आजार हा संसर्गित असल्या कारणाने नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना हा संसर्ग विषाणू असल्या कारणाने नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाने कोरोना आजाराला न घाबरता सुरक्षित अंतर ठेवून व मास्कचा वापर करूण स्वच्छता राखावी. तसेच शासनाने घातलेल्या अटी शर्तीचे व नियमांचे पालन प्रत्येक नागरिकांनी करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे शहरजिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे व राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर सचिव तन्वीर मणियार यांच्या वतीने स्वरक्षण किट व मास्कचे वाटप करताना राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप, युवक अध्यक्ष अभिजित खोसे, अमित खामकर, संतोष ढाकणे, सज्जाद बागवान, सनी साठे , सतीश शिरसाठ आदीसह रिक्षाचालक पदाधिकारी चालक उपस्थित होते.