अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक
नगर, (दि.19 सप्टेंबर) : युवकांना काँग्रेस पक्षात काम करण्याची चांगली संधी असून, नेतृत्व गुण असलेल्या युवकांना पक्षात संधी देण्यात येते. ग्रामीण भागातून आलेला युवक देखील या पक्षात आपले कर्तृत्व सिध्द करु शकतो. पक्षातील कार्यकर्त्यांनी काम करत रहावे त्यांच्या कार्याचा निश्चित दखल घेऊन त्यांचा सन्मान होणार आहे. प्रत्येक युवा कार्यकर्त्यावर इंडियन युथ काँग्रेसचे लक्ष असून, लवकरच युवकची नवीन कार्यकारणी जाहीर केली जाणार असल्याचे सूतोवाच युवक काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र निरीक्षक प्रियंका सानप यांनी केले.
काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र निरीक्षक सानप बोलत होत्या. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रशांत ओगले, अहमदनगर निरीक्षक अकील पटेल, जिल्हाध्यक्ष सोमेश्वर दिवटे, जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, युवक शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे, गौरव डोंगरे, राहुल उगले, तुषार पोटे, राजू बोरुडे, संदीप पुंड, साहिल सादिक, मोसिन शेख, गणेश भोसले, देवेंद्र कडू, संदेश म्हस्के, अनिकेत पाचपुते, योगेश शिंदे आदिंसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
किरण काळे म्हणाले की, युवकांना काँग्रेस मध्ये संघटन कौशल्य व नेतृत्व गुण असलेल्या युवकांना संधी दिली जाणार आहे. पदाधिकार्यांची निवड त्यांच्या क्षमतेनुसार होणार असून, यामध्ये कोणाचीही शिफारस चालणार नाही. कोरोनाचे संकट हटल्यानंतर महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संजिल्हा दौरे करुन 25 हजार युवकांचा मेळावा घेणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त करुन युवा कार्यकर्त्यांना कार्य सुरु ठेवण्याचे आवाहन केले.
काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात अहमदनगर जिल्हा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र निरीक्षक सानप बोलत होत्या. यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव प्रशांत ओगले, अहमदनगर निरीक्षक अकील पटेल, जिल्हाध्यक्ष सोमेश्वर दिवटे, जिल्हाध्यक्ष निखिल पापडेजा, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, युवक शहर जिल्हाध्यक्ष मयूर पाटोळे, गौरव डोंगरे, राहुल उगले, तुषार पोटे, राजू बोरुडे, संदीप पुंड, साहिल सादिक, मोसिन शेख, गणेश भोसले, देवेंद्र कडू, संदेश म्हस्के, अनिकेत पाचपुते, योगेश शिंदे आदिंसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
किरण काळे म्हणाले की, युवकांना काँग्रेस मध्ये संघटन कौशल्य व नेतृत्व गुण असलेल्या युवकांना संधी दिली जाणार आहे. पदाधिकार्यांची निवड त्यांच्या क्षमतेनुसार होणार असून, यामध्ये कोणाचीही शिफारस चालणार नाही. कोरोनाचे संकट हटल्यानंतर महसुल मंत्री ना.बाळासाहेब थोरात व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संजिल्हा दौरे करुन 25 हजार युवकांचा मेळावा घेणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त करुन युवा कार्यकर्त्यांना कार्य सुरु ठेवण्याचे आवाहन केले.