कोरानामुळे मृत झालेल्याची खरी आकडेवारी मिळण्यासाठी आयुक्तांच्या दालनात ठिय्या


नगर, (दि.15 सप्टेंबर) : अहमदनगर जिल्हयात करोना रुग्णांची संख्या वाढतच असून, मृत्यूचे प्रमाण देखील जास्त आहे. अमरधाममध्ये होणार्‍या अंत्यसंस्कराची संख्या आणि मनपाने मृत झालेल्या कोरोनाग्रस्तांची  संख्या पाहता खूप मोठी तफावत आढळल्याने प्रशासन खरी संख्या का लपवते  ?  असा सवाल  आजी - माजी नगरसेवकांनी केला. 


कोरोना मृतांची खरी संख्या जाहीर करावी, या मागणीसाठी आजी-माजी नगरसेवकांनी महापालिका आयुक्त कार्यालयात मंगळवारी (दि.15) दुपारी सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन केले.


मागील आठवड्यात अमरधाममधील कोरोनाग्रस्त मृतांवर झालेल्या अंत्यसंस्कराची यादी बोरा ट्रस्टकडून घेतली.  त्यात 456 जणांवर अंत्यसंस्कार झाल्याची नोंद होती तर मनपाकडून 300 रुग्ण दगावल्याची माहिती दिली गेली होती. 


यामध्ये  तफावत  आढळल्याने प्रशासन मृतांची संख्या लपवत आहे का ?  अशी शंका आल्याने  मनपाकडे चौकशी केली.  आयुक्त आरोग्य अधिकार्‍यांकडून काही माहिती मिळेना, खरी माहिती व सत्य लपण्याचा प्रयत्न होतो हे यावरुन दिसते, असे निखील वारे व बाळासाहेब पवार यांनी म्हंटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post